शेती सुटणे हाच शेतीप्रश्न सोडवण्याचा अंतिम उपाय
आज शेतकरी शेतीतून बाहेर पडतोच आहे, पण मजबुरीने. बाहेर पडतो म्हणजे बाहेर फेकला जातो. असे बाहेर पडणे नको आहे. असे बाहेर पडणे जास्त दु:खदायी आहे. शेतकऱ्याला संघटनेची, चळवळीची गरज आहे ती शेती करणे सुकर व्हावी यासाठी नाही, तर शेतीतून आपल्या अटीवर बाहेर पडून सन्मानाने जगता यावे यासाठीच.......